Description
Popular Prakashan Vyamoha Marathi by Prabha Ganorkar
प्रभा गणोरकरांच्या 'व्यामोह' या कवितासंग्रहाची सुरुवातच बालकवींच्या 'हृदयाची गुंतागुंत' या कवितेतील उद्धृताने होते आणि मग या संग्रहातील ७२ कविता वाचताना त्या कवितांच्या व्यामोहाने आपलाही जीव दडपत जातो. कवितेच्या निवेदिकेच्या मनात साचून आलेली औदासिन्याची भावना प्रतीत होत राहते. प्रभाताईंची कविता विलक्षण आत्ममग्न आहे. वाचकानुनय तर राहोच, पण निवेदिकेच्या अंतर्विश्वात वाचकाला सामावून घेण्यासाठी म्हणूनसुद्धा त्याबद्दलचा एखादा तपशील ती देत नाही. गणोरकरांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलते आणि त्या बव्हंशी निसर्गप्रतिमा असतात. क्वचितच कधीतरी 'लिफ्ट'सारखी शहरी प्रतिमाही त्यांच्या कवितेत येते मात्र एरव्ही भेटतात त्या पाऊस, नदी, झाडे, पाने, फुले, पाखरे यांसारख्या सर्वसामान्य निसर्गप्रतिमाच. कधीतरीच त्या विशिष्ठ होतात, जसे 'तंतुएवढे पाय हलवीत निघणारे लाल इंद्रगोप' (आज, प्रिय आई), अन्यथा त्या समुद्रातून चालताना सरकणारी पायाखालची वाळू, झिजलेले दगड उराशी घेऊन जुन्या करण्याचे प्रतिबिंब वागवीत पडून असलेली नदी, उघडी पडलेली मुळे, डोंगरात धडाडून पेटलेले वणवे अशा प्रतिमाच त्यांच्या कवितेत प्रामुख्याने आलेल्या दिसतात.... सगळ्याच औदासिन्य जागवणाऱ्या. या कवितांमागे आहे निवेदिकेचे समग्र आयुष्य. त्यांत बालपणीची स्मरणे आहेत, जी अतिशय रम्य आहेत. कदाचित आजच्या उदास परिप्रेक्ष्यातून स्मरताना बालपण आणि त्या वेळचा परिसर अधिकच रम्य भासत असेल. स्वप्नवत भासत असेल असे वाटते. निवेदिकेच्या मनातले दुःख हे की तिचे आजचे जग हे तिचे नाही, तिला ते नको आहे. तिच्या घराकडे जाणारी वाट धुळीची वाट मागे जात जात कुठेतरी हरवून गेली आहे. या कवितांमध्ये निवेदिकेचे स्वतःचे दुःख आहेच तसेच तिच्या भोवतालच्या व्यक्तींचीही दुःखं आहेत. त्